*पुस्तकांचे महत्त्व* * कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. * पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं. * आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे. * इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो. * पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही. परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणू...
तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे...?? मित्रांनो, सर्वात आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या.... देवाने आपल्याला या जगात विनाकारण पाठवले असेल का...??? आपल्याला या जगात पाठवण्यामागे काय उद्देश असेल बरं??? मला वाटते तुमच्यापैकी काही लोकांचे उत्तर असेल की, देवाने आपल्या सर्वांना या जगात असच विनाकारण तर अजिबात पाठवलेले नाही... आपल्याला या जगात पाठवण्यामागे नक्की कोणता तरी उद्देश आहे... मित्रांनो, जगात येण्याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला आधीच समजला असता तर जगात अशी कोणतीही व्यक्ती उरणार नाही जी कोणत्याही उद्देशाशिवाय जीवन जगत असेल.... मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आजुबाजूला बघितले तर तुम्हाला असे खूप लोकं सापडतील जे कोणतेही ध्येय नसताना जीवन जगत आहेत... दिवसभर टीव्ही पाहतात... रात्री जेवण करतात आणि मस्त झोपतात...😅 👉 मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की... जे लोकं यशस्वी होतात त्यांना या जगात येण्यामागचा हेतू माहिती असेल का??? माझ्या मते तर अजिबात नाही... त्या लोकांना माहिती नसते देवाने त्यांना कोणत्या हेतूसाठी या जगात पाठवले आहे.... 👉 आता सर्वात मोठा प्रश्न असा ...
नेहमी Gratitude स्टेजमध्ये रहा... 👉 मित्रांनो, एक वडील आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा एका रेल्वे मध्ये बसलेले असतात. थोडयावेळाने रेल्वे सुरु होते. मुलगा खिडकी बाहेर पाहतो आणि वडिलांना काही प्रश्न विचारतो. बाबा बाबा हे काय आहे. बाबा सांगतात बाळा ते झाडे आहेत...🌳 पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो, बाबा बाबा हे काय आहे... बाबा म्हणतात बाळा ते पक्षी आहेत...🦜 पुन्हा थोड्या वेळाने मुलगा प्रश्न विचारतो बाबा बाबा हे काय आहे. त्यावर वडील म्हणतात बाळा ते पर्वत आहेत...⛰️ मुलगा पुन्हा थोड्या वेळाने प्रश्न विचारतो बाबा बाबा हे काय आहे. बाप मुलाला म्हणतो बाळा ते तलाव आहे... 👉 हे पाहुन समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्या मुलाच्या बापाला म्हणतो तुम्ही या पागल मुलाचा इलाज का करत नाही...??? त्यावर वडील म्हणतात माझ्या मुलाचे कालच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे... आणि आजच तो हे नवीन जग पाहत आहे...😊 👉 मित्रांनो, एक विचार करा... जो व्यक्ती हे जग पाहु शकत नाही... त्यांच्यासाठी हे जग कसे असेल... तो व्यक्ती देवाच्या मंदिरात गेल्यावर देवाला काय मागत असेल.??? यावर थोडा विचार करा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback