धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास..

 

धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास..

👉 आज अंबानी घराण्याला सगळेच ओळखतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मुकेश आणि अनिल अंबानी असेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही बनलेत. त्यांना प्रसिद्ध आणि श्रीमंत बनवण्यात त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांचा हात आहे. आज या लेख मध्ये  तुम्हाला सांगणार आहे की, ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेले धीरूभाई अंबानी ७५,००० करोडचे मालक कसे बनलेत.

सांगितले जाते की, धीरूभाई अंबानी जेव्हा गुजरात मधून मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. हळूहळू संघर्ष करत त्यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य उभे करून दिले. धीरूभाईचे म्हणणे होते मी, जर तुम्ही स्वप्ने साकार नाही केलेत तर ते दुसरे कुणीतरी करून घेईल. त्यांनी सगळ्या जगासमोर आपलं लोखंड बनवलं आणि दाखवून दिलं की, जर तुमच्यात संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. आपल्या मेहनत आणि अनेक वर्षांच्या संघर्षाच्या जोवर ते देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन बनले.

ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की, धीरूभाई आधी भजे तळण्याचे काम करत होते. धीरूभाई अंबानीचा जन्म २८ सप्टेंबर १९३२ साली एका सामान्य शिक्षक घरात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना 10वी नंतर शिक्षण सोडावे लागले होते. शिक्षण सोडल्यानंतर ते जुनागढ मध्ये माऊंट गिरनारला येणाऱ्या पर्यटकांना भजे विकण्याचे काम करू लागले. पण या कामातून त्यांना जास्त पैसा मिळायचा नाही. म्हणून मग ते यमनच्या ऐडन शहरात ‘ए.बस्सी’ कंपनी सोबत काम करू लागले. जिथे त्यांना ३०० रु महिना पगार मिळायचा.

👉 जेव्हा ते मायानगरी मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५०० रु होते. परंतु मुंबईने त्यांचं भाग्य बदलून टाकलं. फक्त ५०० रुपये घेऊन येणाऱ्या व्यक्तीने १९६६ मध्ये गुजरातच्या नौरदा शहरात पहिली टेक्सटाईल कंपनी स्थापन केली. केवळ १४ महिन्यात १०,००० टन पॉलिएस्टर यार्न संयंत्र स्थापित करून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यांनी स्वतःचा ब्रँड लाँच केला ज्याचे नाव ‘विमल’ ठेवलेले. भले आर्थिक तंगीमुळे ते शिक्षण पूर्ण करू शकले नव्हते पण त्यांच्यात व्यवरहारचे विशेष कौशल्य होत. त्यांना कळलं होतं की, शेअर मार्केटला आपल्या पक्षाचा भाग बनवलं जाऊ शकत.

👉 आपल्या मेहनतीच्या जोवर धीरूभाई अंबानीनी रिलायन्स इंडस्ट्रीजला आज ह्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे. १९७६ मध्ये ७० करोडची कंपनी २००२ मध्ये ७५०० करोडची बनून गेली. कंपनीची वाढ इतकी जबरदस्त झाली की, रिलायन्स आज टॉप ५०० कंपनी मध्ये शामिल आहे. फोर्ब्सने २००२ साली जारी केलेल्या श्रीमंतांच्या यादीत धीरूभाई १३८ व्या स्थानावर होते. त्यावेळी त्यांची एकूण मालमत्ता २.९ बिलयन डॉलर होती. आणि त्याच वर्षी ६ जुलैला त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट