प्रेरणादायी गोष्ट..
मित्रांनो, एक मोठे श्रीमंत राज्य असते, त्या राज्यामध्ये एक नियम असतो जो खूप वर्षापासून चालत आलेला असतो...
👉 नियम असा असतो की, जो पण राजा बनेल त्याला 5 वर्षानंतर जवळच्या मोठ्या घनदाट जंगलात सोडलं जायाचं...
राजा कोणी ही बनो आणि कोणी कितीही चांगले काम करो... शेवटी त्याला जंगलात नेऊन जंगली प्राण्यामध्ये सोडलं जायाचं...
एके दिवसी एका साधारण व्यक्तीला त्या राज्याचा राजा घोषित केलं जाते...🤴
त्या साधारण व्यक्तीला माहिती असते की आपण कितीही चांगले काम केले आणि कितीही चांगल वागलो तरी पण शेवटी आपल्याला जंगलात नेऊन सोडलं जाईल...
हा साधारण व्यक्ती बाकी राजासारखाच सुरुवातीचे दोन तीन वर्ष खूप एन्जॉय करतो...
नंतरच्या दोन वर्षात त्या व्यक्तीला खूप भीती वाटायला लागते, कारण पाच वर्ष संपायला आता फक्त दोन वर्ष बाकी असतात...त्या व्यक्तीला त्याच्या समोर त्याची खतरनाक मृत्यू दिसायला लागते. जंगल दिसायला लागते ज्यामध्ये खूप जंगली प्राणी असतात...
तो व्यक्ती त्या जंगलाबद्दल खूप विचार करतो, हुशार व्यक्तीसोबत चर्चा करतो
आणि नंतर त्याच्या डोक्यात एक विचार येते, तो एका साधु महाराजाकडे जातो साधु महाराजाला भेटतो आणि सर्व प्रॉब्लेम साधु महाराजांसोबत share करतो.
👉 साधु महाराज म्हणतात, बाळा जे आधीपासून चालु आहे ते तसंच चालु ठेवायच की ते बदलायच ह्या दोन्ही गोष्टी तुझ्या हातात आहेत...
आज तु या राज्याचा राजा आहेस...🤴 तु काही ही करू शकतोस आणि काही ही बदलू शकतोस...👍
हे सर्व ऐकून राजा घरी येतो. घरी आल्यावर साधु महाराजाने सांगितलेल्या विचाराबद्दल थोडा बारीक विचार करतो...आणि थोड्या वेळाने तो सैनिकाना बोलवतो आणि सैनिकाना सांगतो....
जवळच्या जंगलात जा आणि त्या जंगलात कोणकोणते प्राणी आहेत ते पाहून या...
सैनिक जंगलात जातात आणि तेथल्या जंगलात राहणाऱ्या प्राण्याची सर्व माहिती गोळा करतात आणि ती माहिती राजाला देतात...
👉 काही दिवसाने राजा परत सैनिकाना आदेश देतो की, जंगलात जा आणि प्राण्याची शिकार करुन आणा, जंगली प्राण्यांना पकडा आणि दुरच्या जंगलात सोडुन द्या...
सैनिक जंगलात जातात आणि जंगली प्राण्याला पकडता काही प्राण्याची शिकार करुन परत येतात...
👉 असंच काही दिवसानंतर राजा परत सैनिकाना सांगतो की स्वयंपाक बनवायला इंधन नाही, तुम्ही जंगलात जा आणि तेथेले झाडे लाकडे तोडून घेऊन या...
सैनिक रोज जंगलात जातात आणि झाडे तोडून घेऊन येतात.
काही महिन्यानंतर ते जंगल एक सफाट मैदान बनते... जंगलातील सर्व प्राणी दुसऱ्या जंगलात निघुन गेलेले असतात...
हळूहळू त्या सफाट मैदानावर लोकं घर करून राहायला लागतात... त्या मैदानावर हळूहळू एक नवीन शहर तयार होते...
इकडे राजा राज्यातील गरीब लोकांना सांगतात, ज्याला घर नाही, जागा नाही अशी लोकं त्या सफाट जमिनीवर घर करुन राहू शकतात...
राजाने गरीब लोकांना फुकट जमीनी दिल्या त्यांना आर्थिक मदत केली... लोकं त्या मैदानावर तेथे घर करून राहू लागली तेथे पिण्याच्या पाण्याची सोय केली. विहीरी, मंदिरे बांधली...
राजा सामान्य लोकांची खूप काळजी घ्यायचा म्हणून सामान्य लोकं पण राजावर खूप प्रेम करायचे... ❤
👉 असेच त्या राजाचे पाच वर्ष पूर्ण होतात... नवीन राजा गादीवर बसतो आणि जुन्या राजाला रथात बसवून सैनिक जंगलाकडे घेऊन निघतात... आणि जेथे पहिले जंगल होतं तेथे आणून सोडतात...😄
आधी जेथे जंगल होते तेथे आता नवीन शहर उदयाला आले होते...
त्या नवीन शहरातील सर्व लोकं राजाची आरती करण्यासाठी, राजाचे वेलकम करण्यासाठी उत्सुक होते...सर्व लोकं राजाची आनंदाने वाट पाहत होते...
राजा रथातुन उतरतात आणि आनंदाने शहरात प्रवेश करतात... शहरातील लोकं राजाची आरती करतात आणि विनंती करतात की तुम्ही इथले आमचे राजे बना, येते राज्य करा...आणि तो सामान्य माणुस त्या नवीन शहराचा राजा बनतो आणि बाकीचे जीवन आनंदाने जगतो...
आशा प्रकारे तो साधारण व्यक्ती राजा बनतो 5 वर्ष राज्य करतो आणि आपला जीव पण वाचवतो आणि स्वतःचे पुढील जीवन आनंदी पण बनवतो... ❤
मित्रांनो, ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे... परंतु ह्या गोष्टीमधुन आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे.
मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल सर्व काही माहिती आहे...
👉 पुढील 10 वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती कशी असेल, तुम्ही श्रीमंत व्हाल की अजुन गरीब व्हाल ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत...तरी पण तुम्ही दिवसभर Youtube इंस्टाग्रामवर फुल्ल टाईमपास करत आहात...🙆♂️
👉 पुढील वर्षी तुमचे आरोग्य कसे राहील हे पण तुम्हाला 100% माहिती आहे...तरी पण तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी काहीच पाऊल उचलत नाही आहात...
मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तरं द्या
📌 आज तुम्ही जसे जीवन जगत आहात तसेच जीवन तुम्हाला पुढील 10 वर्ष जगायला आवडेल का??
नाही आवडणार... बरोबर ना
मग तुमचं जीवन सुंदर होण्यासाठी तुम्ही काय कराल...??
स्वतःच्या सवयी बदलाल की आहे त्याच सवयीमध्ये पडुन राहालं.
तुम्ही जर स्वतःच्या सवयी बदल्या तरच परिणाम बदलेल...तुम्ही तुमच्या सवयी बदल्याच नाही तर तुम्हाला वेगळे परिणाम पाहायला मिळणारच नाही...
मित्रांनो, गोष्टीमधल्या त्या राजाला माहिती होते की पाच वर्षानंतर त्याला घनदाट जंगलात सोडलं जाईल त्यामुळे त्याने आधीच जंगलाची माहिती काढुन ते जंगल एका सुंदर शहरात बदलून टाकले...याचा फायदा असा झाला की जो पण नवीन राजा बनेल त्याला 5 वर्षा नंतर त्याचं नवीन शहरात सोडलं जाईल... थोडक्यात कोणत्याच नवीन राजाचा जीव आता जाणार नव्हता...
मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर, सर्वात आधी तुमच्या सवयी बदला... स्वतःला एकाच जागेवर बसून ठेवु नका...🙏🏻
आज तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करुन, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत चॅटिंग करुन तुम्हाला आनंद मिळतं असेल परंतु हा आताचा आनंद तुमच्या काहीच कामी नाही... सोशल मीडियावर किमती वेळ वाया घालवता,चॅटिंग करता परंतु तुमच्या करियरच काय... याचा विचार तुम्ही कधी केला आहे का??
क्षणिक सुखासाठी तुम्ही तुमचे आयुष्य बरबाद करत आहात...
मित्रांनो, तुमचे आयुष्य कसे बदलेल हे तुम्हाला 101% माहिती आहे. तुम्हाला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे तरी पण तुम्ही Comfort Zone मध्ये अडकून पडले आहात...Comfort Zone च्या बाहेर पडा...
👉 मित्रांनो, तुम्हाला तुमचं पुढील आयुष्य खराब दिसत असेल तर, ते सुंदर कसं बनेल याचा आज विचार करा आणि आजपासून कामाला लागा... कारण जीवन तुमचं आहे... तुम्हालाच तुमचं जीवन सुंदर करावं लागेल त्यामुळे जीवनात आता थोडं सिरीयस व्हा...
सवयी माणसाला घडवतात पण आणि बिघडवतात पण...त्यामुळे स्वतःला चांगल्या सवयी लावा...वाईट गोष्टीपासून स्वतःला दुर ठेवा. रोज स्वतःला 1% Improve करत रहा...नवीन Skills शिकत रहा... 👍🏻
Thank You...🙏🏻🌹😇
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback