स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार...
यश मिळविण्यासाठी काय करावे, यावर स्वामी विवेकानंदांचे विचार...
महान स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते, परंतु बालपणातच त्यांना प्रेमाने नरेंद्र म्हणून म्हटले जात असे.
👉 स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते, ते त्यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित व यशस्वी वकील होते, त्यांची इंग्रजी व पर्शियन भाषेवर हि प्रभुत्व होते आणि ते उत्तम इंग्रजी आणि पर्शियन बोलत.
👉 विवेकानंदच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते, जी धार्मिक विचारांची एक स्त्री होती, ती रामायण आणि महाभारत अशा धार्मिक ग्रंथांचेही उत्तम ज्ञान असलेली अतिशय प्रतिभावान महिला होती. तिला इंग्रजी भाषेचीही चांगली जाण होती.
👉 स्वामी विवेकानंदांच्या आई आणि वडिलांच्या चांगल्या मूल्यांमुळे आणि त्यांच्या पालनपोषणामुळे स्वामीजींच्या जीवनाला चांगला आकार मिळाला आणि ते उच्च गुणवत्तेचे धनी झाले.
त्यांना तरुणपणापासूनच अध्यात्माच्या क्षेत्रात रस होता, ते नेहमी शिव, राम आणि सीतेसारख्या देवाच्या चित्रांसमोर ध्यान करीत असे. संत आणि तपस्वी यांच्या बोलणे नेहमीच त्यांना प्रेरणा देत असे .
आणि हेच नरेंद्र नाथ पुढे जाऊन जगभरातील ध्यान, अध्यात्म, राष्ट्रवाद, हिंदूत्व आणि संस्कृतीचे वाहक बनले आणि स्वामी विवेकानंदांच्या नावाने प्रसिद्ध झाले...
मित्रांनो, एक तेजस्वी व्यक्तिमहत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खुप प्रभावी होते, जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होईल, एवढेच नाही तर विवेकानंदानी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यत्मिक विचारींनी सुद्धा लोकांना प्रेरित करतील...
मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार खालीलप्रमाणे आहेत... विचार वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागू करा...
1) हे कधीही म्हणू नका की, मी करू शकत नाही कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही काहीही करू शकता...
2) उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका...
3)एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपले जीवन बनवा, त्याचे स्वप्न पहा आणि त्या विचाराने जगा...
4) महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो...
5) घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही...
6) मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका...
7) कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.
जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या..
8) स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही...
👉 स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी National Youth Day – राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरी केली जाते. विवेकानंद जी एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांचा प्रत्येकावर खोल प्रभाव आहे...
मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला स्वामी विवेकानंद यांची माहिती आणि त्यांचे विचार आवडले असतील...
मित्रांनो, Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा...
भेटूयात पुढच्या लेखात...
Nice Narendra... Kee it up
उत्तर द्याहटवाkhup chhan Narendra
उत्तर द्याहटवा