आता पुढे काय...??🤷♂️
आता पुढे काय...??🤷♂️
मित्रांनो, पिंजऱ्यात कैद असलेला पोपट तुम्ही बघितला असेलच...🦜
पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असला तर पोपट पळुन जाण्याचा नक्की प्रयत्न करतो...
परंतु पोपट पिंजऱ्याच्या बाहेर यायला लागला की माणुस परत त्या पोपटाला धरतो आणि पिंजऱ्यात कैद करतो...
मित्रांनो, माणुस जसा पोपटाला जबरदस्ती पिंजऱ्याच्या आत कैद करून ठेवतो...त्याचपद्धतीने माणुस स्वतःच्या मनात इतरांबद्दलचा राग, द्वेष, भीती यासारख्या विचारांना पण मनामध्ये कैद करून ठेवतो...
मित्रांनो, तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, बदला घेण्याची इच्छा असेल, चिडचिड असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात भीती असेल तर तुम्ही आनंदी जीवन कधी जगुच शकणार नाही...
जेथे पण तुम्ही जाशाल तेथे तुमच्या मनातील विचार, मनातील भीती तुम्हाला आनंदी राहु देणार नाही...
जसे की,
👉 तुम्हाला अंधारात जायची भीती वाटत असेल तर ही भीती तुम्ही जो पर्यंत मनातून काढुन टाकणार नाही तो पर्यंत ही भीती तुमच्या मनामध्येच राहील... तुम्ही अमेरिकेला पण राहायला गेले तरीपण तुम्हाला अंधाराची भीती वाटेल म्हणजे वाटेल...
मित्रांनो, तुम्ही जसे पोपटाला पाळत असता तसेच तुम्ही तुमच्या मनात शैतान असलेल्या विचारांना देखील पाळत असता...तुम्ही त्या शैतान विचारांना स्वतंत्र करतच नाही...त्यामुळे मनात साठवून ठेवलेले विचार, राग, द्वेष, भीती तुम्हाला मानसिक रोग मोफत देऊन जातात...
मित्रांनो, तुम्ही असे खूप लोकं पाहिले असतील जे बाईक /कार अपघातामध्ये थोडक्यात वाचले असतील...
👉 जे लोकं अपघातामध्ये वाचतात आशा लोकांच्या मनात ऍक्सिडेंटची भीती खोल पर्यंत रुजली जाते....ते लोकं परत कधीच कारमध्ये बसत नाही किंवा गाडी चालवत असताना खूप भितीने गाडी चालवत असतात...
👉 एखाद्या व्यक्तीला प्रेमात धोका मिळाला असेल तर तो व्यक्ती परत कधीच प्रेम करत नाही...
तो प्रेमाचा नेहमी तिरस्कार करेल, प्रेमाबद्दल त्या व्यक्तीचा मनात नेहमी राग असेल...
मित्रांनो, आजपर्यंत तुमच्यासोबत जे काही वाईट घडलं असेल त्या प्रत्येक गोष्टीकडे पहा आणि स्वतःला विचारा, आता पुढे काय करायच आहे...??
तुम्हाला मनातला राग मनातच ठेवायचा आहे की मनातला राग बाहेर काढुन एक सुंदर आनंदी जीवन जगायचं आहे, हा एक निर्णय आज तुम्हाला घ्यायचा आहे...
मित्रांनो, तुमच्या मनातील शैतान विचारांना आज स्वतंत्र करा,
मन हलके करा, मनामध्ये असलेला कचरा बाहेर फेकून द्या...
मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मन हलके कसे करावे...??
मन हलके करण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगत आहे, त्या वाचा आणि Follow करा...⏳
📌 राग व्यक्त करा...
👉 मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा खूपच राग आला असेल तर आशा वेळी बाहेर जा, शांत ठिकाणी बसा आणि मनातला राग काढुन टाका...
जोरात ओरडा, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, मनात जेवढा पण राग साठवून ठेवला असेल तो राग व्यक्त करा...
📌 माफी मागा किंवा माफ करा...
👉 मित्रांनो, चुकून तुम्ही कोणाला वाईट बोले असाल किंवा पुढचा व्यक्ती तुम्हाला वाईट बोला असेल तर आशा वेळी... पुढच्या व्यक्तीला माफ करा... किंवा माफी मागुन मन हलकं करा...
रागाच्या भरामध्ये आपन घरातील लहान मुलांवर, भाऊ बहीणीवर, आई बाबावर ओरडतो... परंतु राग शांत झाल्यावर आपल्याला आपल्याच वागण्याचा पच्याताप होतो...
शांत झाल्यावर आपल्याला आपली चुक दिसायला लागते आशा वेळी चूक मान्य करून sorry बोला, जेणेकरून तुम्हाला वाईट वागण्याचा त्रास होणार नाही...
📌 कागदावरती लिहुन, मनातील विचार, राग व्यक्त करा...
👉 मित्रांनो, मन हलकं करण्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे, जेंव्हा पण तुम्हाला कोणाचा राग येईल, चिडचिड होईल, किंवा मनात वाईट विचार येत असतील तर आशावेळी, एक कोरा कागद घ्या आणि त्या कागदावर मनातील सर्व विचार लिहा....नंतर तो कागद गोळामोळा करून बाहेर फेकून द्या किंवा जाळून टाका... असे केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल...आणि तुमचं मन हलकं होईल...
📌 मित्रांसोबत प्रॉब्लेम share करा...
👉 मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम मित्रांसोबत share करा.
मनात जो पण चांगला वाईट विचार असेल तो विचार मित्रांसोबत share करा.. मनातील गोष्टी मित्रांसोबत share करा.. तुमचे मन हलके होईल..
मित्रांनो, वरील सर्व टिप्स दोन तीन वेळा वाचा, आणि मन हलके करा.
👉 जीवनात घडलेला वाईट घटनाचा स्वीकार करा, मनातील सर्व वाईट विचारांना, वाईट लोकांना आज माफ करून, आनंदी जीवनाला सुरुवात करा.
मित्रांनो, असेच प्रेरणादायी लेख तुम्हाला रोज वाचायचे असतील तर तुम्ही माझा एक वर्षाचा प्रीमियम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता..
आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
धन्यवाद..🙏🏻🌹😇
✍✍ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
खूप सुंदर विचारधारा सर 👍🏻👌🏻❤️
उत्तर द्याहटवा