पोस्ट्स

यक्तिमत्व विकास कसा करायचा?

 यक्तिमत्व विकास कसा करायचा? तुमच्या फायद्याच्या टिप्स 1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका, कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल. 2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत. 3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेन्यूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका, शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा. 4. तुझ अजून लग्न झालं नाही? तू अजून घर बांधलं नाहीस? असे समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही. 5. नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष; कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुम्हाला कमीपणा येत नाही. 7. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले, तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे द्या. 7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा. 8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका. 9. जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी...

मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा.*_

इमेज
 आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा. 👉 आपले आरोग्य हे जितके शारीरिक घटकांवर अवलंबून असते, तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त ते आपल्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते. सतत चिंता, ताणतणाव, स्पर्धा, हेवेदावे, मत्सर, भीती, असुरक्षितता अशा नकारात्मक भावनांचा पगडा आपल्या मानसिकतेवर असेल, तर आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्याउलट सकारात्मक मानसिकता आरोग्यावर चांगला परिणाम करते. ही सकारात्मकता प्रयत्नपूर्वक जोपासता येते. त्यासाठी फक्त आपल्या मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. आपला स्वभाव कसाही असला, तरी तो प्रयत्नांनी बदलता येतो आणि सकारात्मकतेचे लाभ मिळवता येतात… दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक निराशेचे, मानहानीचे प्रसंग, ताण वाढवणार्‍या घटना, दु:खद आठवणी, अपेक्षाभंग अशा अनेक नकारात्मक बाबींचा सामना करावा लागतो. आपल्या मनाची शक्ती कमी करणार्‍या या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. कारण, नकारात्मतेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होत असतो. हे परिणाम टाळून आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्य...

मूर्खाशी वाद घालू नका, गप्प रहा

एकेदिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्‍हणाला, ''बिरबल, एक प्रश्‍न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्‍यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्‍कीच नसणार तेव्‍हा मला त्‍यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे''  बिरबल म्‍हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीतून आपल्‍याला काय निष्‍पन्न होणार आहे तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्‍यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्‍याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्‍यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्‍न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्‍याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्‍यांना दरबारात जा...

जीवनात मार्गदर्शन करणारा गुरु पाहिजेतच

  एखाद्या अनोळखी ठिकाणी पत्ता शोधताना जसं आपण ठराविक व्यक्तीला रस्ता विचारतोच ना? तसेच, आपल्या आयुष्यात ध्येयाचा पाठलाग करायचा असेल तर अनुभवी, वयस्कर आणि तुमच्या क्षेत्रातील पारंगत व्यक्तींना नक्की गुरू म्हणून स्वीकारा! ध्येयाच्या वाटेवरील प्रवास सुलभ होईल आणि आयुष्य सुखकर होईल..

ध्येय निश्चित करा

 ध्येय निश्चित करा जीवनाला अर्थ द्या,  भले ते मोठे असो या लहान.  ज्याचा ध्येय निश्चित नाही तो जिवंत तर आहे  पण त्याच्या जगण्याला अर्थ नाही...
इमेज
  नमस्कार मित्रांनो,  आजच्या लेख मध्ये आपण Law Off Average  ( सरासरी चा कायदा )  बद्दल माहिती पाहणार आहोत.  law Off Average म्हणजे काय ?  Law Off Average म्हणजे काय हे आपण एका उदाहरणा वरुण पाहूया   समजा,  तुम्हाला तुमच्या घरच्या गार्डन मध्ये वेगवेगळ्या  फुलाचे 50  झाडे लावायचे आहेत.   तुम्ही 50 झाडे लावता त्यामधुन 10 झाडे उगवत नाही, खराब बियामुळे  आणि राहिलेल्या 40 झाडांपैकी 30 झाडे उगवतात आणि 10 झाडे नैसर्गिक कारणामुळे उगवत नाही  म्हणजेच 50 झाडे लावल्यानंतर 30 झाडे सविस्तर वाढतात 30 झाडे हा average झाला त्या बगीचाचा  50: 20: 30 मित्रांनो परत एक उदाहरण पाहुयात  मित्रांनो तुम्ही  जो पण व्यवसाय करता किंवा तुम्हाला माल विकण्याचे Average काढायच असेल तर ते खाली दिलेल्या उदाहरण वरून काढु शकता   समजा,  तुमचे कपड्याचे दुकान आहे तुमच्या दुकानात दररोज 500 ग्रहाक येतात त्या पैकी 200 ग्राहक माल  बगतात विचारपुस करतात परंतु विकत घेण्यासाठी नाही म्हणतात.  परंतु 300 ग्राहक माल बगतात विचारप...

धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास..

इमेज
  धीरुभाई अंबानीचा जीवनप्रवास.. 👉 आज अंबानी घराण्याला सगळेच ओळखतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मुकेश आणि अनिल अंबानी असेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही बनलेत. त्यांना प्रसिद्ध आणि श्रीमंत बनवण्यात त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांचा हात आहे. आज या लेख मध्ये  तुम्हाला सांगणार आहे की, ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेले धीरूभाई अंबानी ७५,००० करोडचे मालक कसे बनलेत. सांगितले जाते की, धीरूभाई अंबानी जेव्हा गुजरात मधून मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. हळूहळू संघर्ष करत त्यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य उभे करून दिले. धीरूभाईचे म्हणणे होते मी, जर तुम्ही स्वप्ने साकार नाही केलेत तर ते दुसरे कुणीतरी करून घेईल. त्यांनी सगळ्या जगासमोर आपलं लोखंड बनवलं आणि दाखवून दिलं की, जर तुमच्यात संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. आपल्या मेहनत आणि अनेक वर्षांच्या संघर्षाच्या जोवर ते देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन बनले. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की, धीरूभाई आधी भजे तळण्याचे काम करत होते. धीरूभाई अंबानीचा जन्म २८ सप्टेंबर १...