पोस्ट्स

किंग कँम्प जिलेट यांच्या यशाची कहाणी

इमेज
  किंग कँप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन होता. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. एक दिवस आपण असा एखादा शोध लावायचा कि संपूर्ण जगात आपलं नाव होईल आणि आपल्याला भक्कम  पैसेही मिळतील. परंतु एका सामान्य माणसासाठी ते एक अशक्य कोटीतलच स्वप्नं होतं. तरीही जिलेट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करीतच राहिला.  👉 तब्बल २८ वर्षांनी त्याला यश मिळालं तेव्हा जिलेट हे नाव तब्बल दोनशे देशातील लाखो करोडो लोकांना ठाऊक झालं होतं. वयाच्या ७७ व्या वर्षी १९३२ मध्ये त्याचे निधन झाले तरीही *आज ८० वर्षानंतर जिलेट हे नाव जिलेट ब्लेड, जिलेट सेफ्टी रेझर, जिलेट ट्वीन ब्लेड, जिलेट ट्रिपल ब्लेड, जिलेट शेविंग क्रीम, जिलेट ब्रश म्हणून जगातील अब्जावधी लोकांच्या ओठावर रोजच असते.*  👉 २००५ मध्ये प्रोक्टर एंड ग्याम्बलने जिलेट कंपनी ५७ बिलिअन डॉलरला म्हणजे तब्बल ३ लाख ४२ हजार कोटी रुपयांना खरेदी केली तरी जिलेट हे नाव कायम ठेवले. किंग कँप जिलेटच्या त्या अफाट स्वप्नाला, त्याच्या त्या अविश...

नियोजन जीवनाचे

👉 1 जानेवारी 2021 ला तुम्ही  स्वतःला बदलण्यासाठी खुप खुप plan बनवले असतील,  स्वतःचे स्वप्न आपण कसे पुर्ण करू याबद्दल पण तुम्ही खुप नियोजन केले असतील. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही प्रत्येक  दिवसाचा टाइम टेबल ठरवला असेल... जगातला प्रत्येक व्यक्ती 1 जानेवारी ला नवीन नवीन योजना बनवतो, चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न सुद्धा  करतो...  1 जानेवारीला केलेले नियोजन, नवीन सकंल्प खुप लोक Follw सुद्धा करतात, परंतु 15 दिवसांनी त्यांच्या तो उत्साह एकदम गायब होते, आणि आजचे काम उद्यावर ढकलण्याची त्यांना  सवय लागते... आणि हि सवय माणसाला बरबाद करते  👉 मित्रांनो, आजपासुन जुन महिना सुरु होत आहे,  याचा अर्थ असा आहे,  की 2021 वर्षाचे 5 महिने संपले, या 5 महिन्यात  खुप लोकांनी अभ्यास केला असेल, खुप लोकांनी पुस्तके वाचले असतील.  परंतु  काही लोकांनी या 5 महिन्यात फक्त आणि फक्त Time Pass केला असेल.    👉 मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि जो थांबतो तो संपतो. मित्रांनो, आज पर्यंत तुम्ही, जो  काही Time Pass केला असेल, youtube वर वे...

Affirmation

 _*Affirmation*_ 👉 मित्रांनो, माणसाला  एका दिवसात 60 हजार विचार येतात, त्यामध्ये काही विचार पॉसिटीव्ह असतात तर काही विचार निगेटिव्ह असतात...  आज दिवसभरात तुम्ही जे विचार  करता त्यामधले 90 % विचार हे दुसऱ्या दिवसी रिपीट होतात...  मित्रांनो, तुम्ही रोज सकारत्मक विचार करून जीवन बदलु शकता... तुमचा  एक बदल,  तुमचे पुर्ण जीवन बदलु शकते...  मित्रांनो, Affirmation तुम्ही दोन  प्रकारे करू शकता..  1) विचार करून  2) बोलुन  Affirmation चा  उपयोग करून तुम्ही subconscious Mind द्ववारे लवकर यश प्राप्त करू शकता... (Subconscious Mind काम कसे करते या साठी  तुम्हाला The Power of Subconscious mind हे पुस्तक वाचा )  मित्रांनो, तुम्ही आता जसे आहात, ते सर्व त्याच विचाराने बनलेले आहेत, जे विचार तुमच्या  Subconscious mind मध्ये असतात... Affirmation म्हणजेच  आपण आपल्या स्वतःची  बोलायचं आहे...    फक्त बोलायचंच नाही तर चांगला विचार सुद्धा करायचा, पॉसिटीव्ह वाक्य बोलायचं   स्वतःला बोलण्याची ही प्रक्रिया कम...

मोबाईल आणि यश...

इमेज
  मोबाईल आणि यश 👉 तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचे सुत्र लक्ष्यात घ्या कारण यश आणि वेळ याचं खुप जवळच नातं आहे... जगात असा कोणताच श्रीमंत व्यक्ती नाही जो गेलेला वेळ परत आणू शकेल, आणि जगात असा कोणताच गरीब  व्यक्ती नाही ज्याला वेळ मिळत नाही... मित्रांनो, तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब तुम्हाला दिवसाचे 24 तासच मिळतात, ना कुणाला जास्त ना कुणाला कमी सर्वांना वेळ सारखाच मिळतो...  आता प्रश्न असा येतो की, जर सर्वांना सारखाच वेळ मिळतो तर सर्वजन यशस्वी का होत नाही ... 👉 याचं उत्तर खुप सोफे आहे, जगात जेवढे महान लोक होऊन गेले आणि जे महान लोक सध्या आहेत, त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एक गोष्टीचा फरक आहे तो म्हणजेच- *Time Management* चा  👉 यशस्वी लोक 24 तासाचे नियोजन करतात, कोणत्या गोष्टीमध्ये Time Invest करायचा,  कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा किंवा कोणती गोष्ट कशी करायची याचे प्रिंसिपल त्यांना माहिती आहेत... 👉 जगातील सर्वात गरीब व्यक्ती असेल किंवा श्रीमंत, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा बिजनेस मॅन,  तुम्ही सध्या जे कोणी असाल त्यांना एक गोष्ट सांगु इच्छितो, देवा...

सोडून द्यायला शिका...

 *सोडून द्यायला शिका...* 👉 माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील. 👉 सोडून द्या : दुसऱ्यांना सतत टोमणे मारणे. 👉 सोडून द्या : दुसऱ्यांच्या सतत चुका काढणे. 👉 सोडून द्या : दुसऱ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे. 👉  सोडून द्या : दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणे. 👉 सोडून द्या : दुसऱ्याची कागाळी करणे. 👉 सोडून द्या : दुसऱ्यांच्या दुःखात आपले सुख मानणे. 👉 सोडून द्या : दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे. 👉  सोडून द्या : दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहणे. 👉 सोडून द्या : दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करत राहणे. 👉 सोडून द्या  : दुसऱ्याची फालतू चौकशी करणे. 👉 सोडून द्या :  दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे. 👉 सोडून द्या : तुमचा खोटा अहंकार 👉 सोडून द्या : स्वतः दुःखात...

यक्तिमत्व विकास कसा करायचा?

 यक्तिमत्व विकास कसा करायचा? तुमच्या फायद्याच्या टिप्स 1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका, कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल. 2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत. 3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेन्यूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका, शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा. 4. तुझ अजून लग्न झालं नाही? तू अजून घर बांधलं नाहीस? असे समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही. 5. नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष; कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुम्हाला कमीपणा येत नाही. 7. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले, तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे द्या. 7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा. 8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका. 9. जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी...

मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा.*_

इमेज
 आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा. 👉 आपले आरोग्य हे जितके शारीरिक घटकांवर अवलंबून असते, तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त ते आपल्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते. सतत चिंता, ताणतणाव, स्पर्धा, हेवेदावे, मत्सर, भीती, असुरक्षितता अशा नकारात्मक भावनांचा पगडा आपल्या मानसिकतेवर असेल, तर आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्याउलट सकारात्मक मानसिकता आरोग्यावर चांगला परिणाम करते. ही सकारात्मकता प्रयत्नपूर्वक जोपासता येते. त्यासाठी फक्त आपल्या मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. आपला स्वभाव कसाही असला, तरी तो प्रयत्नांनी बदलता येतो आणि सकारात्मकतेचे लाभ मिळवता येतात… दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक निराशेचे, मानहानीचे प्रसंग, ताण वाढवणार्‍या घटना, दु:खद आठवणी, अपेक्षाभंग अशा अनेक नकारात्मक बाबींचा सामना करावा लागतो. आपल्या मनाची शक्ती कमी करणार्‍या या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. कारण, नकारात्मतेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होत असतो. हे परिणाम टाळून आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्य...