संगतीचे महत्व...
👉 मित्रांनो, एक प्रश्न मला हमेशा विचारला जातो, तो प्रश्न असा की, चांगल्या लोकांच्या संगतीत राहून खरंच आपण बुद्धीमान, हुशार होऊ शकतो का...?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे...
हो
या प्रश्नाचं उत्तर सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण आइनस्टाइन सरांची एक गोष्ट पाहुया...
👉 मित्रांनो, आइनस्टाइन च्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की, सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसुन आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत, सर्व भाषण पाहिलेली आहे...
हे ऐकुन आइनस्टाइन खुप हैराण झाले
👉 ते म्हणाले ठीक आहे, आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत तेथील आयोजक मला ओळखत नाहीत, तेथे माझ्या ऐवजी तु बोल मी तुझा ड्राइव्हर म्हणुन बसतो...
👉 सभा सुरु झाली आणि सभेमध्ये ड्राइव्हर स्टेजवर गेला आणि त्याने भाषणाला सुरवात केली.
उपस्थित सर्वांनी खुप टाळ्या वाजवुन त्याला प्रतिसाद दिला.
👉 पण त्याच वेळेस तेथे उपस्थित एका प्रोफेसरने त्याला विचारले की सर आपण आत्ता सापेक्षताची जी परिभाषा सांगितली ती परत एकदा व्यवस्थित समजुन सांगता का ?
👉 खाली ड्राइव्हर म्हणुन जे खरे आइनस्टाइन बसले होते त्यांना वाटले आता चोरी पकडली जाणार... 😄
परंतु स्टेजवरील ड्राइव्हरचे उत्तर ऐकुन ते हैराण झाले... 😱
👉 ड्राइव्हरने त्या प्रोफेसरला उत्तर दिले की इतकी सोपी गोष्ट आपल्याला कळाली नाही.
काही हरकत नाही ही गोष्ट तुम्ही माझ्या ड्राइव्हरला विचारा तो पण तुम्हाला समजुन सांगेल...
सांगण्याचं तात्पर्य :- जर आपण नेहमी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहीलो तर आपणही निश्चितच बुद्धिमान होवु शकतो...
परंतु
आपली रोजची उठबस जर मुर्ख लोकांसोबत असेल तर आपली बुद्धी सुद्धा त्यांच्यासारखी होवु शकते, त्यामुळे संगत ही हमेशा चांगल्या लोकांसी करा... 😊
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसी तुमची संगत असते तसेच तुम्ही बनत असता त्यामुळे आपली संगत कोणत्या आणि कशा मित्रांसोबत आहे ते तपासा आणि सकरात्मक विचार करणाऱ्या मित्रांसोबत दोस्ती करा....👍
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback