*पुस्तकांचे महत्त्व*
*पुस्तकांचे महत्त्व* * कोणत्याही प्रकारचे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटले जाते. पुस्तक हे लेखकाची कल्पनाशक्ती, भावना आणि ज्ञान प्रतिबिबित करते. पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. * पुस्तक लिहिणारे लेखक सुद्धा हे जग सोडून जातात. पण पुस्तक मात्र कायम तसच राहत. पुस्तक हे कोणत्याही लेखकाचे कार्य आणि नाव उज्ज्वल करतं. * आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट वर जाऊन शोधणे ही एक सामान्य पद्धत आहे. * इंटरनेट हा ज्ञान प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु पुस्तकांचे महत्त्व हे आजही कायम आहे. कारण आजही शाळेमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून शिकवले जाते. आज कुठूनही पुस्तके खरेदी करु शकतो. * पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही. परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणू...
Pn vyast kashat tevav sir
उत्तर द्याहटवा