Time is Money...
मित्रांनो, जो व्यक्ती वेळेची आणि पैसाची बचत करतो तोच व्यक्ती यशस्वी आणि श्रीमंत बनु शकतो...
मित्रांनो, वेळेची बचत आणि पैसाची बचत ही कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी मी एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येईल... 😊
👉 मित्रांनो, अजय आणि विजय हे दोन मित्र असतात... दोघेही गरीब असतात.. एक दिवस
रस्त्यावरून जाताना दोघांना पण 20 लाख, 20लाख रुपये सापडतात....
👉 आता अजय जवळ 20लाख रुपये आहेत, आता तो विचार करतो कि, आपण खुप महागाची कार खरेदी करू आणि मस्त कार मधुन फिरू आणि मस्त शान मारू असा विचार करतो आणि दोन दिवसानंतर अजय 20 लाखाची कार खरेदी करतो.... 🚘
👉 तसेच विजय जवळ सुद्धा 20 लाख रुपये आहेत... आता विजय विचार करतो कि, मी 20 लाख रुपयांचे काय करू शकतो, काय विकत घेऊ शकतो... विजय खुप विचार करतो आणि शेवटी ठरवतो कि 20 लाख रुपयेचे शेत विकत घेऊ आणि विजय 4 एकर शेत खरेदी करतो, विकत घेतो...
मित्रांनो, देवाने अजय आणि विजयला सारखेच पैसे दिले होते... आणि दोघांने सुद्धा पैशाचा वेगवेगळा उपयोग केला...
मित्रांनो, आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या..
5 वर्षानंतर अजय आणि विजय मधुन सर्वात श्रीमंत कोण बनेल...?
हो तुमचे उत्तर एकदम बरोबर आहे... सर्वात श्रीमंत विजय बनेल...
👉 मित्रांनो, अजय ने क्षणिक सुखासाठी 20 लाख रुपये खर्च केले... आणि 5 वर्षानंतर त्याची गाडी सुद्धा जुनी होईल आणि तो परत गरीब बनेल कारण कि त्याने सर्व पैसा आणि वेळ त्या कार मध्ये गुंतवले होते... आणि जसे जसे दिवस जाऊ लागले तशी तशी त्या कारची किंमत कमी होत होती आणि 5 वर्षा नंतर कारची किंमत एकदम कमी झाली... आणि अजय पुन्हा गरीब झाला
👉 दुसरीकडे विजय ने 20 लाख रुपयांचे 4 एकर शेत विकत घेतले होते.... आणि शेतात येणारा माल विकून विजय प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपये एक्सट्रा कमाई करत होता...
आणि 5 वर्षांनी विजयच्या शेताचे भाव सुद्धा चारपट्ट वाढले.. 20 लाखाची शेतीचा भाव 5 वर्षांनी 80 लाख रुपये झाला...
थोडक्यात विजय श्रीमंत बनला
मित्रांनो, देवाने अजय आणि विजयला तर सारखेच पैसे दिले होते... तरी पण एक गरीब बनला तर दुसरा श्रीमंत झाला... 🤷♂️
असे का झाले असेल...
याचे कारण आहे कि, अजय ने क्षणिक सुखासाठी पैसे आणि वेळ वाया घातला...
आणि
विजयने Life Time सुखासाठी पैसे आणि वेळ इन्व्हेस्ट केला होता म्हणुन तो आज श्रीमंत बनला...
मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, देव सुद्धा आपल्या सर्वांना रोज सारखाच वेळ देतो... दिवसाचे 24 तास
तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब तुम्हाला दिवसाचे 24 तासच मिळत असतात....
आता तुमच्यावर डिफेंड आहे कि तुमच्या जवळ असलेल्या वेळेचा उपयोग तुम्ही क्षणिक सुखासाठी करता कि, पूर्ण जीवन सुखी होण्यासाठी वेळेचा उपयोग करता...? हे तुमचे तुम्हाला ठरवायचं आहे... 🤷♂️
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असतातच... तुमचे सुद्धा खुप मोठे स्वप्न असतीलच...
परंतु आजच्या तारखेला खुप विद्यार्थी, खुप लोक क्षणिक सुखासाठी प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास वाया घालवत आहेत... आणि रोज मिळालेला वेळ वाया घालण्याची सवय लोकांना होत आहे...
👉 मित्रांनो, तुमच्या जवळ असलेला वेळ स्वतःसाठी आणि Life Time मिळणाऱ्या सुखासाठी इन्व्हेस्ट करा.... वेळ मिळाला तर पुस्तके वाचा... मित्रांसोबत पार्ट्या करण्यापेक्षा त्या पैसामधुन वेगवेगळे पुस्तके विकत आणा... ते पुस्तक वाचा....
एक गोष्ट लक्षात ठेवा....
👉 तुम्ही आज इंस्टाग्राम, फेसबुक, गर्लफ्रेंड, Youtube या साऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही कधीच नोकरीला लागणार नाही आणि 5 वर्षानंतर तुम्हाला दुसऱ्याच्या हाता खाली काम करावे लागेल... 😄
मित्रांनो, तुम्ही पाहिलेले स्वप्न हे तुम्हालाच पूर्ण करावे लागणार आहेत... एखादा सुपरस्टार येऊन तुमचे स्वप्न पूर्ण करणार नाही त्यामुळे क्षणिक सुखासाठी वेळ वाया घालवू नका... 🙏
येणारे 5 वर्ष Life Time मिळणाऱ्या सुखासाठी इन्व्हेस्ट करा... खुप अभ्यास करा... नंतर होईल असे कि तुम्हाला एखादी नोकरी लागेल... नोकरी आहे म्हणुन तुम्हाला छान मुलगी सुद्धा मिळेल आणि तुमचे पूर्ण जीवन आनंदी होईल आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल... 😊
आज जर तुमचे वय 20 ते 30 च्या मध्ये असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी खुप महत्वाचे आहेत...त्यामुळे तुमचा वेळ फक्त पुस्तके वाचण्यासाठी द्या... स्वतःला घडवा...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
जीवनावश्यक माहिती
उत्तर द्याहटवा